MGNREGA name new VB-G RAM G ;ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनांमध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. जुनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) आता नवीन स्वरूपात येत आहे. या नवीन योजनेचे नाव विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन (ग्रामीण) किंवा संक्षिप्त रूपात जी राम जी योजना (VB-G RAM G) असे आहे. हे बदल ग्रामीण कुटुंबांसाठी अधिक रोजगाराच्या संधी आणण्यासाठी आहेत. या लेखात आपण योजनांच्या तुलनेसह सविस्तर माहिती घेऊ.
MGNREGA योजनेची थोडक्यात माहिती
MGNREGA ही २००५ मध्ये सुरू झालेली केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला किमान १०० दिवसांचा वेतनाधारित रोजगार देण्याची कायदेशीर हमी देते.
ही योजना पूर्णपणे मागणीवर आधारित आहे – म्हणजे गरजू कुटुंबाने रोजगार मागितला की तो देणे बंधनकारक आहे. यात पाणी साठवण, रस्ते बांधणी, झाडे लावणे अशी कामे समाविष्ट आहेत.
वेतन राज्यानुसार वेगळे असते आणि ते केंद्र सरकार दरवर्षी जाहीर करते. ही योजना ग्रामीण भागातील गरिबी कमी करण्यात आणि दुष्काळासारख्या संकटांमध्ये मदत करण्यात महत्त्वाची ठरली आहे. अधिक माहितीसाठी rural.gov.in ही अधिकृत वेबसाइट पहा.
नवीन जी राम जी योजना काय आहे?(VB-G RAM G yojana)
जी राम जी योजना म्हणजे विकसित भारत – गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन (ग्रामीण) बिल २०२५. केंद्र सरकारने डिसेंबर २०२५ मध्ये लोकसभेत हे विधेयक सादर केले आहे.
ही योजना MGNREGA ची जागा घेऊन अधिक मजबूत आणि आधुनिक स्वरूपात येत आहे. यात ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची हमी तर आहेच, पण ती १२५ दिवसांपर्यंत वाढवली आहे.
सरकारचा दावा आहे की ही योजना पाणी सुरक्षा, शेती आणि ग्रामीण विकासावर अधिक भर देईल. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाने, यात १.५१ लाख कोटींहून अधिक निधीची तरतूद आहे. ही योजना ग्रामीण भारताला विकसित करण्याच्या ध्येयाशी जोडलेली आहे.
दोन्ही योजनेत नेमके काय बदल?
MGNREGA आणि नवीन जी राम जी योजनेत काही महत्त्वाचे फरक आहेत:
- रोजगाराचे दिवस: जुनी योजना १०० दिवसांची हमी देते, तर नवीन योजना १२५ दिवसांची.
- कायदेशीर रचना: MGNREGA पूर्णपणे मागणीवर आधारित आहे, तर नवीन योजनेत सरकारच्या योजनांनुसार कामे निश्चित होऊ शकतात (काही समीक्षकांचे मत).
- वेतन भुगतान: नवीन योजनेत काम पूर्ण झाल्यानंतर ७ किंवा १५ दिवसांत पैसे देण्याची तरतूद आहे – हे जुण्यापेक्षा जलद आहे.
- निधी वाटप: नवीन योजनेत राज्यांचा हिस्सा वाढू शकतो, तर MGNREGA त मुख्यतः केंद्राकडून निधी येतो.
- उद्देश: दोन्ही योजनांमध्ये ग्रामीण रोजगार हा मुख्य आहे, पण जी राम जी योजनेत पाणी आणि शेती विकासावर विशेष लक्ष आहे.
हे बदल ग्रामीण भागातील मजुरांना अधिक संधी देण्यासाठी आहेत.
नवीन योजनेतील तरतुदी काय आहेत?
जी राम जी योजनेत खालील मुख्य तरतुदी आहेत (विधेयकानुसार):
- प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला १२५ दिवसांचा वेतनाधारित रोजगाराची कायदेशीर हमी.
- १५ दिवसांत रोजगार न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता मिळेल.
- वेतन दर सुरुवातीला MGNREGA सारखेच राहतील, नंतर केंद्र सरकार नवे दर जाहीर करेल.
- कामे मुख्यतः असहाय्य (unskilled) असतील, पण काही प्रमाणात कुशल कामांचा समावेश शक्य.
- जलद पेमेंट – कामानंतर लगेचच पैसे खात्यात.
- मोठा निधी – ग्रामीण विकासासाठी १.५१ लाख कोटींहून अधिक तरतूद.
ही योजना लागू झाल्यास ग्रामीण मजुरांना अधिक दिवस काम मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. तरीही काही तज्ज्ञांचे मत आहे की मागणीवर आधारित अधिकार कायम राहिला पाहिजे.
ही माहिती सरकारच्या अधिकृत घोषणा आणि PIB वर आधारित आहे. योजना पूर्णपणे लागू झाल्यानंतर अजून नियम स्पष्ट होतील. ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक पंचायत किंवा ग्रामसेवकांकडे संपर्क साधावा.