शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून आणखी एक सुवर्णसंधी – भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) ही एक महत्वाकांक्षी योजना असून, बागायती शेतीसाठी सरकारकडून थेट आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. पारंपरिक शेतीतून बाहेर पडून शाश्वत शेतीकडे वळण्याचा संदेश देणारी ही योजना खरंतर ग्रामीण विकासाचे दार उघडणारी आहे.ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. ही योजना 2018-19 मध्ये सुरू झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना 100% अनुदान मिळते, ज्यामुळे बागायती शेतीसाठी आर्थिक पाठबळ मिळते.
जर तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाचा लाभ कसा घ्यायचा, योजनेचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल माहिती हवी असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. चला, या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
(Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana)ही योजना नेमकी आहे तरी काय?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र शासनाने 2018-19 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १००% अनुदान दिले जाते. पारंपरिक पिकांमध्ये सततची घसरण, खर्चात वाढ आणि नफा कमी यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आलेले आहेत. अशा वेळी फळबाग लागवड ही अधिक फायद्याची व दीर्घकालीन उत्पन्नाची हमी देणारी ठरते.सध्या, महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी सोयाबीन, तूर, आणि कापूस यासारखी पारंपरिक पिके घेतात, ज्यामुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. परिणामी, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबतात. या समस्येवर उपाय म्हणून, सरकारने ही योजना आणली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि ठिबक सिंचन यासाठी पूर्ण अनुदान मिळते.
या योजनेचे अनुदान कसे मिळते ?
योजनेतून पात्र शेतकऱ्याला एकूण ₹53,561 चे अनुदान दिले जाते. हे अनुदान तीन टप्प्यांत मिळते:
- पहिल्या वर्षी: ५०% अनुदान
- दुसऱ्या वर्षी: ३०% अनुदान
- तिसऱ्या वर्षी: २०% अनुदान
महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक वर्षीचा पुढील टप्प्याचा लाभ मिळवण्यासाठी फळझाडांची जिवंतता आवश्यक आहे.
- कोरडवाहू शेतीत: ८०% झाडे जिवंत असणे आवश्यक
- बागायती शेतीत: ९०% झाडे जिवंत असणे आवश्यक
जर झाडांची संख्या कमी झाली, तर शेतकऱ्यांना स्वखर्चाने नवीन झाडे लावून त्यांची देखभाल करावी लागेल. यानंतरच पुढील अनुदान मिळेल.
पात्रता निकष कोणते आहेत?
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आणि मूळ शेतकरी असावा.
- शेतावर ठिबक सिंचन प्रणाली असणे बंधनकारक आहे.
- शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब: ज्या कुटुंबाचे उत्पन्न पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, त्यांना प्राधान्य दिले जाते.
- 7/12 उतारा: शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाने 7/12 असणे आवश्यक आहे.
- संमतीपत्र: जर शेतात इतर हिस्सेदार असतील, तर त्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे.
- इतर योजनांचा लाभ: जर शेतकऱ्याने यापूर्वी इतर सरकारी योजनांतून फळबाग लागवड केली असेल, तर उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
- जमिनीची अट:
- कोकण: किमान 0.1 एकर (10 गुंठे) आणि जास्तीत जास्त 10 हेक्टर.
- इतर भाग: किमान 0.2 एकर (20 गुंठे) आणि जास्तीत जास्त 6 हेक्टर.
- प्राधान्य गट: लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, महिला, आणि अपंग शेतकऱ्यांना प्राधान्य.
योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा
फळबाग लागवड योजनेचे नेमके फायदे काय आहेत ?
- ₹1,10,000 पर्यंत आर्थिक सहाय्य
- मोफत फळझाडे आणि ठिबक सिंचन
- दीर्घकालीन उत्पन्नाची हमी
- लहान व अल्पभूधारक, महिला, दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य
- जल व्यवस्थापन सुधारणा व पाणी बचत
या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- आधार कार्ड
- 7/12 आणि 8-अ उतारा
- जात प्रमाणपत्र
- स्वयंघोषणापत्र
- इतर हिस्सेदारांचे संमतीपत्र (आवश्यक असल्यास)
अर्ज कसा करायचा? (Bhausaheb Fundkar Falbag Yojana Apply Online)
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनासाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम, आवश्यक कागदपत्रे गोळा करा.
- महा-डीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in) वर भेट द्या.
- नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करा किंवा विद्यमान खात्यात लॉगिन करा.
- कृषी विभाग निवडा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पर्यायावर क्लिक करा.
- वैयक्तिक माहिती, जमीन आणि बँक तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जाची माहिती तपासून सबमिट बटणावर क्लिक करा.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- स्थानिक कृषी विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर 21 दिवसांच्या आत लेखी अर्ज सादर करा.
- अर्जांचे परीक्षण करून लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात.
- निवड झालेल्या शेतकऱ्यांनी दोन दिवसांत कागदपत्रे सादर करावीत.
- सरकारी रोपवाटिकेतून रोपे खरेदी करण्याची परवानगी मिळते.
ठिबक सिंचन अनिवार्य का?
- पाण्याची बचत
- फळबागेचा दर्जा टिकवण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन
- 100% अनुदानात ठिबक सिंचन उपलब्ध
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही केवळ अनुदान देणारी योजना नाही, तर ती शेतकऱ्यांचे भविष्य बदलणारी संधी आहे. जर तुम्ही अजून अर्ज केलेला नसेल, तर आजच सरकारी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरा. ही योजना तुमच्या शेतीला उत्पन्नाचे नवे दार उघडून देईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
ऑफलाइन अर्ज करायचा असल्यास काय करावे?
उत्तर:
- स्थानिक कृषी विभागात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 21 दिवसांत लेखी अर्ज सादर करावा
- अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते
- निवड झाल्यास आवश्यक कागदपत्र दोन दिवसांत सादर करावीत
ठिबक सिंचन अनिवार्य का आहे?
उत्तर:
ठिबक सिंचन प्रणालीमुळे पाण्याची बचत होते, उत्पादनात वाढ होते आणि फळझाडे टिकतात. त्यामुळे योजनेअंतर्गत 100% अनुदानावर ठिबक सिंचन बंधनकारक आहे.
आधीच फळबाग लागवड केलेली असल्यास योजना लागू होते का?
उत्तर:
पूर्वीच्या योजनेतून घेतलेल्या फळबाग क्षेत्रास अनुदान मिळणार नाही. मात्र उरलेल्या नव्या क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.
कोणते फळझाडे लागवडीसाठी योग्य आहेत?
उत्तर:
योजना अंतर्गत प्रादेशिक हवामान आणि जमीन यानुसार आंबा, संत्रा, मोसंबी, डाळिंब, सीताफळ, चिकू, बोर, आवळा इत्यादी फळझाडांची लागवड प्रोत्साहित केली जाते.
योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर:
- पारंपरिक शेतीऐवजी फळबाग लागवडीला प्रोत्साहन
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे
- शाश्वत शेतीला चालना
- पाणी व्यवस्थापन सुधारणा
अर्ज सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असते?
उत्तर:
- अर्जाची तपासणी केली जाते
- पात्रता ठरवली जाते
- लॉटरीद्वारे लाभार्थी निवड
- निवड झाल्यानंतर सरकारी रोपवाटिकेतून झाडांची उपलब्धता
- अनुदान टप्प्याटप्प्याने वितरित